मुंबई : नाशिक-नांदूरनाका येथे खासगी प्रवासी बसला शनिवारी पहाटे औरंगाबाद येथे अपघात झाला, या अपघातानंतर बसने पेट घेतल्यामुळे ११ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात नाशिक-नांदूरनाका येथे झाला असून चिंतामणी ट्रॆव्हल्स या खासगी प्रवासी वाहतूक करणा-या कंपनीची ही बस औरंगाबाद नाशिक मार्गावरून यवतमाळहून मुंबईकडे येत होती. पहाटे सव्वापाचच्या सुमारास बसला डंपरने धडक दिली. पहाटेची वेळ असल्याने बसमधील प्रवासी झोपेत होते. अपघात झाल्यानंतर बसने तात्काळ पेट घेतला. यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही.

