Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गुणवंत विद्यार्थी बक्षीस योजनेत पुर्वीप्रमाणे बदल करा तसेच सी बी एस ई व आय सी एस ई यांनाही पुन्हा बक्षीस योजना चालू करा : विलास मडिगेरी

 


- आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन दिले लेखी निवेदन
- योजनांमध्ये तत्कालीन आयुक्तांनी बदल केल्यामुळे नाराजी..


पिंपरी :  पिंपरी चिंचवड महापालिका नागरवस्ती विभागाअंतर्गत दहावी आणि बारावी बक्षीस योजना, तसेच इतर योजनांमध्ये प्रशासकीय कारभार सुरू झाल्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी अनेक बदल केले. या निर्णयामुळे विद्यार्थी व  पालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तरी सर्व योजनांमध्ये पूर्वीप्रमाणे बदल करावेत. तसा धोरणात्मक निर्णय प्रशासक म्हणून आयुक्त शेखर सिंह यांनी तातडीने घ्यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केली आहे.
 
या संदर्भात विलास मडिगेरी यांनी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका समाज विकास विभाग इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत अंतर्गत दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस योजना अनेक वर्षापासून महानगरपालिकेच्या वतीने चालू केलेली आहे. इतर कल्याणकारी योजने अंतर्गत दहावी मध्ये 80% पेक्षा गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 10,000 बक्षीस देण्यात येत आहे. दहावी मध्ये ९०% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना 15,000 बक्षीस देण्यात येत आहे तसेच बारावी मध्ये उतीर्ण झालेल्या 80 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस योजना रु.15,000 रुपये होते. परंतु तत्कालीन आयुक्तानी प्रशासकीय राजवटीमध्ये बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 80 टक्के एवजी 90 टक्के करण्यात आली आहे. परंतु, हे अयोग्य असून महानगरपालिकेने पूर्वीप्रमाणे 12 वि साठी पुन्हा 80 टक्के करावी.
 
इतर कल्याणकारी योजनेअंतर्गत दहावी व बारावी मध्ये ८० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना बक्षीस रक्कम १०,००० व १५,००० यापूर्वी सर्व बोर्डाना म्हणजे महाराष्ट्र बोर्ड, सीबीएससी आयसीएसई लागू होते. परंतु तात्कालीन आयुक्तांनी प्रशासकीय राजवटी कार्यकाळामध्ये फक्त एस.एस.सी बोर्ड यांनाच देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे प्रक्रिया ऑनलाईन चालू आहे. त्यामुळे ही  बक्षीस योजना सीबीएससी आयसीएसई यांनाही पूर्वी प्रमाणेच सुरू करावी तसेच नागरवस्ती योजनेअंतर्गत यापूर्वी सर्व प्रत्यक्ष अर्ज भरून सोबत लागणारे सर्व कागदपत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरी सुविधा केंद्र मार्फत स्वीकारत होतो. तत्कालीन आयुक्तांनी नागरवस्ती विभागातील सर्व प्रकारचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने चालू केले आहे. त्यातून अनेक प्रकारचे तक्रारी येत आहेत. तरी या संदर्भात तातडीने ऩिर्णय घेऊन आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, असे विलास मडिगेरी यांनी नमूद केले आहे.
 
"ऑनलाईन पध्दतीने भुर्दंड, नागरिकांमध्ये नाराजी"

महानगरपालिकेची फॉर्म भरण्यासाठी असलेली वेबसाईट व्यवस्थित नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनाभरता येत नाही. शहरातील झोपडपट्टीमध्ये ऑनलाईन व स्कॅनीग सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये जावे लागते. तेथे 150, 200 व 300 रुपये आकारले जात असल्याने या सगळ्यात विद्यार्थी व पालकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे ऑनलाईन पद्धत बंद करून प्रत्यक्ष यपूर्वीसारखे अर्ज स्विकारले जावेत. फॉर्म भरण्यासाठी खूप वेळ लागतो. या कारणामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकामध्ये प्रचंड नाराजी आहे. नागरवस्ती विभागातील सर्व प्रकारचे अर्ज भरण्याची ऑनलाइन पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याची पध्दत अवलंबविण्यात यावी, असे विलास मडिगेरी यांनी म्हटले आहे.
12 वी 80 टक्के बदल करण्याचे तसेच सीबीएससी आयसीएसई चालू करण्याचे सकारात्मक आश्वासन आयुक्तांनी दिले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...